जळगाव : जळगाव सुवर्ण बाजापेठेत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अर्थात चांदीच्या दरात तब्बल ६,१८० रुपयांची, तर सोन्याच्या दरात १ तोळ्यामागे ७२१ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीच्या विचारात असलेल्यांना काहीचा दिलासा मिळाला आहे.
जळगाव सुवर्ण बाजापेठेत चांदीच्या दरात तब्बल ६१८० रुपयांची घसरण होऊन चांदीचे प्रती किलो दर २,४९,२६० रुपयांवर आले आहेत. सोन्यात प्रति १ तोळ्यामागे ७२१ रुपयांची घट झाली आहे. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १, ४०, २८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
दरम्यान, चांदीच्या दरात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोमवार वगळता सलग घसरण सुरु आहे. सोमवारी चांदी ४२२० रुपयांनी वाढली. त्यानंतर मंगळवारी ९१७० रुपयांची बुधवारी ३६१५ तर गुरुवारी ६१८० रुपयांची अशी तीन दिवसात एकूण १८,९६५ रुपयांची घसरण नोंदवली गेली.
दर आणखी कमी होतील का?
ईटीच्या अहवालानुसार, एचएसबीसीने चांदीसाठीचा आपला दृष्टिकोन अद्ययावत केला आहे, ज्यामध्ये येत्या काही वर्षांत किमती हळूहळू कमी होतील असा अंदाज आहे.
तथापि, २०२६ साठी सरासरी किमतीचा अंदाज प्रति औंस ६८.२५ डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. एचएसबीसीचा अंदाज आहे की २०२७ मध्ये चांदीच्या किमती $५७.०० आणि २०२९ पर्यंत $४७.०० प्रति औंसपर्यंत घसरतील.
बँकेने चांदीच्या किमती कमी होण्याचे कारण स्पष्ट केले, असे म्हटले आहे की उद्योगात मागणीत घट झाली आहे आणि उच्च किमतींमुळे दागिने खरेदीदार देखील मोठ्या संख्येने पैसे काढत आहेत.
२०२५ मध्ये चांदीची मागणी २३० दशलक्ष औंसने झपाट्याने कमी झाली असल्याचेही बँकेने म्हटले आहे. २०२६ मध्ये ही मागणी आणखी कमी होऊन १४० दशलक्ष औंस आणि २०२७ मध्ये फक्त ५९ दशलक्ष औंस होईल.









