T20 World Cup 2026 : २०२६ चा टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे १५ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. श्रीलंका या सामन्यासाठी सुरक्षेकडे विशेष लक्ष देत आहे.
श्रीलंकेचे क्रीडामंत्री सुनील कुमारा यांनी सांगितले की, स्पर्धेत कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही भारत-पाकिस्तान सामन्यावर विशेष लक्ष देत आहोत. विमानतळावर आगमनापासून ते त्यांच्या प्रस्थानापर्यंत शस्त्ररक्षक त्यांचे संरक्षण करतील.”
टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तानचा विक्रम
टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तानच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आठ सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी सात सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त एकच जिंकला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान एकूण टी-२० हेड-टू-हेड
भारत आणि पाकिस्तानमधील एकूण टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १६ टी-२० सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने वरचढ कामगिरी केली आहे, त्यांनी १३ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त तीन जिंकले आहेत.









