IND vs NZ 1st T20 : भारतविरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका २१ जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अशात मालिका सुरू होण्यापूर्वी, न्यूझीलंड टी-२० कर्णधार मिचेल सँटनरने टीम इंडियाला इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत मिचेल सँटनर म्हणाले की, “एकदिवसीय सामन्यांमध्ये डॅरिल मिचेलला सुरुवातीला फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करावा लागला, परंतु त्याने कठोर परिश्रम केले. तो फिरकी गोलंदाजी चांगली खेळत आहे. आशा आहे की, तो टी-२० मालिकेतही असेच करू शकेल.”
सँटनर म्हणाले की, न्यूझीलंड संघाला भारतात खेळण्याचा आनंद मिळतो आणि उपखंडीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची मालिका असेल. भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका ३१ जानेवारी रोजी संपेल, २०२६ चा टी-२० विश्वचषक एका आठवड्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी सुरू होईल.
टीम इंडियाला इशारा
मिशेल सँटनर यांनी भारतीय संघाला इशारा देत म्हटले की, “आम्हाला भारताविरुद्ध विविध स्वरूपात यश मिळाले आहे. अर्थात, आमचे सर्वात मोठे ध्येय मालिका जिंकणे आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची तयारी करणे आहे. त्याच परिस्थितीत भारतासारख्या कठीण संघाविरुद्ध खेळणे चांगले होईल, जिथे आम्ही लवकरच विश्वचषक खेळणार आहोत.”
आतापर्यंत, नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडमध्ये फक्त एकच टी-२० सामना खेळला गेला आहे. २०१६ मध्ये खेळलेल्या त्या सामन्यात, न्यूझीलंडने भारतीय फलंदाजी लाईन-अपला उध्वस्त केले.










