PM Setu Yojana : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी (दि. २७ जानेवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यात महत्वाचे म्हणजे युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेमूळे रोजगार संधी मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
प्रथम ‘या’ जिल्ह्यांत होणार अंबलबजावणी
युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यांत अंबलबजावणी होणार असून, पुढील टप्प्यात राज्यभर विस्तार केला जाणार आहे.
रोजगार संधी मिळवणे होणार अधिक सुलभ
विशेषतः युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रोजगार संधी मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय
राज्यात मल्टी प्रॉडक्ट हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट विक्री एकाच ठिकाणी शक्य होणार असल्याने दलालांवरील अवलंबित्व कमी होईल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.










