PM-Kisan Samman Nidhi : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. आता या योजनेतील 22 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर अली आहे. अर्थात काही शेतकऱ्यांना थेट 4 हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा करण्यात आला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी अपूर्ण असणे वा अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे हा हप्ता मिळू शकला नव्हता. अशा शेतकऱयांनी नंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आणि अर्जातील चुका दुरुस्त केल्या असल्यास, त्यांना 21वा आणि 22वा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
होळीच्या आधीच जमा होण्याची शक्यता
सूत्रांनुसार, यंदाचा 22वा हप्ता होळी सणाच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच 4 मार्च 2026 पूर्वी ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही वा त्यांचा अर्ज प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना यावेळीही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून अर्जातील त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)










