होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

LPG Shortage: युद्धग्रस्त क्षेत्रातून 94 हजार मेट्रिक टन एलपीजी इंधन घेऊन जहाजे भारताकडे रवाना

On: March 29, 2026 7:54 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Shortage: एलपीजी पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. त्यावर सरकार तोडगा काढत असून सरकारने पीएनजी (Piped Natural Gas) चा पर्याय समोर आणला आहे. त्यासाठी मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच एक कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे, नुकतीच एक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युद्ध क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणतीही घटना समोर आलेली नाही. तसेच भारताकडे या क्षेत्रातून दोन जहाजे एलपीजी इंधन घेऊन येत आहे, त्यामुळे एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे. सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी इंधन वाहक दोन जहाजे युद्धग्रस्त प्रदेशातून सुरक्षितपणे निघून भारताकडे रवाना झाली आहे.

बीडब्ल्यू टीवायरआर आणि बीडब्ल्यू ईएलएम ही दोन एलपीजी वाहक जहाजे, जी एकूण सुमारे 94,000 एमटी एलपीजी माल घेऊन जात आहेत, ती सुरक्षितपणे या प्रदेशातून बाहेर पडून भारताच्या किनाऱ्याकडे येत आहेत. बीडब्ल्यू टीवायरआर मुंबईकडे येत असून 31 मार्च 2026 रोजी पोहोचण्याची शक्यता आहे आणि बीडब्ल्यू ईएलएम 1 एप्रिल 2026 रोजी मंगरुळुला पोहोचेल.

पश्चिम आखाती प्रदेशात 485 भारतीय खलाशांसह एकूण 18 भारतीय ध्वजांकित जहाजे आहेत. जहाज महासंचालनालय, जहाज मालक, आरपीएसएल एजन्सी आणि भारतीय अभियानाच्या समन्वयाने परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे. संपूर्ण भारतातील बंदरांची कामे सामान्य आहेत, कोणतीही कोंडी झालेली नाही. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या राज्य सागरी मंडळांचे काम सुरळीत सुरू आहे. दरम्यान 28 फेब्रुवारीपासून या प्रदेशातून सुमारे 5,24,000 प्रवासी भारतात परतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment