Social News: सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालत उज्वल विकास बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने कै. ॲड. उज्वला गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम येथे हृदयस्पर्शी पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपल्या समाजातून जे उत्पन्न कमावतो त्यातील एक हिस्सा पुन्हा समाजासाठी वापरावा असा उदांत हेतू ठेवून काम करणारे लोक फार थोडे आहेत. संपूर्ण हयात आपली लोकसेवेसाठी घालवली, गरजूंना मदत केली, कुठलीच अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने ते आपले काम करत राहतात. कै. ॲड उज्वला गायकवाड यांचे तेच कार्य गायकवाड परिवाराने पुढे चालू ठेवले आहे. त्याच्या स्मरणार्थ या प्रसंगी तपोवनातील आश्रमात सुमारे ५० बेघर स्त्री-पुरुषांना अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यातील एक दिवस तरी आनंदाने जावा ही भावना होती. मानवतेची सेवा हीच खरी श्रद्धांजली” हा संदेश या कार्यक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रविंद्रकुमार गायकवाड, सचिव डॉ. अनिल आठवले तसेच सदस्य राजेश काळे, सागर बेदरकर, निलेश खोडे, सौ. मृणाली कर्णिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मयूर शर्मा, विकी बागुल, सौ. हरिता देवरे, चेतन देवरे, कुंदा उदावंत, अतुल उदावंत, अनिल कळंके, अनिल बाठे, नंदिनी टोमपे संदीप कुयटे आदींनी परिश्रम घेतले.







