अर्थसंकल्पावर काय म्हणाले?
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ पुढील एक-दोन वर्षांसाठी नसून, पुढील २५ वर्षांसाठी तयार करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे संबंधित मतदारसंघात जाऊन जनतेला समजावून सांगावेत, असे आवाहन पीएम नरेंद्र मोदी यांनी खासदारांना केले.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आता देशात उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यावर आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांचे उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे भारत एक मजबूत जागतिक उत्पादन केंद्र बनण्यास मदत होईल.
तसेच, देशातील प्रत्येक जिल्ह्यात उत्पादन युनिट्सची परिषद आयोजित करावी. यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, लघु व्यवसायांना व्यासपीठ मिळेल आणि तळागाळात “मेक इन इंडिया” मोहीम बळकट होईल, असेही पीएम मोदींनी सांगितले.









