Heat Wave: संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते, गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक तापमान हे अकोला येथे ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्या खालोखाल वर्धा येथे ४४.० इतके तापमान नोंदवले गेले आहे. तर जळगावला देखील पारा ४१.५. अंश सेल्सियस इतका कायम आहे. विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. विदर्भात तापमानाचा पारा वाढल्याने उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्या दोन तीन राज्यात उष्ण वातावरण आहे, उष्णतेने नागरिक हैराण झाले असून जीवाची लाहीलाही होत आहे. उष्णतेने काही ठिकाणी वादळी पावसाने दिलासा दिला तर पावसाने काही ठिकाणी शेतीचे नुकसान केले आहे. अद्याप एप्रिलचा पंधरवडा जात नाही, तोच उष्णतेचा कहर वातावरणात जाणवत आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील नोंदवलेले तापमान (अंश सेल्सिअस)
:
मुंबई (कुलाबा) ३३.६,
सांताक्रूझ ३३.१,
अलिबाग ३१.५,
रत्नागिरी ३२.५,
पणजी (गोवा) ३४.२,
डहाणू ३३.१,
पुणे ३९.७,
लोहगाव ४१.५,
जळगाव ४१.५,
कोल्हापूर ३८.१
महाबळेश्वर ३३.१,
मालेगाव ४३.४,
नाचशक ३७.५,
सांगली ३९.५,
सातारा ४१.२,
सोलापूर ४३.४,
धाराशीव ४१.२,
छत्रपती संभाजीनगर ४१.४,
परभणी ४२.०,
नांदेड -,
बीड ४०.८,
अकोला ४४.२,
अमरावती ४४.२,
बुलढाणा ४१.५,
ब्रह्मपुरी ४३.२,
चंद्रपूर ४३.४,
गोंदिया ४१.९,
नागपूर ४३.२,
वाशिम ४३.६,
वर्धा ४४.०,
यवतमाळ ४३.२.











