Letest Weather Update: गेल्या २४ तासातील तापमानावर नजर टाकली असता, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर कोंकण गोवा व विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून राज्यात सार्वधिक तापमान अकोल्यात ४३.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर सर्वात कमी तापमान ३१.७ अंश सेल्सियस महाबळेश्वर येथे नोंदवले गेले आहे. जळगावचे तापमान हे ४२.२ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे वातावरणात उकडा कायम आहे, तर हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाडा या विभागाला वादळी पावसासह गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे.
उन्हाळात जळगावचा पारा आता ४२ पार झाला आहे, सकाळपासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होते. दुपारी सूर्य डोक्यावर आला की प्रचंड उष्मा वातावरणात जाणवतो. उष्णतेने नागरिक बेजार झाले आहे, दुपारी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. उष्म्यामुळे तोंडाला कोरड पडत असल्याने या दिवसात भरपूर पाणी पिण्याची गरज आहे, तसेच उष्म्यापासून बचाव करण्यासाठी लिंबू शरबत, ताक, लस्सी, तसेच फळांचा रस आणि उसाचा रस पिण्यास नागरिक पसंत करत आहे. तसंच दुपारी फिरतांना डोक्यात टोपी किंवा उपरणे बांधून घ्यावे, डोळ्यावर चष्मा ठेवावा जेणे करून उष्णतेपासून डोळ्यांचा बचाव करता येईल. गरज असेल तेव्हाच दुपारी घराबाहेर पडा अन्यथा घरीच थांबा किंवा कामाच्या ठिकाणी थांबावे. ऊन कमी झाल्यावर बाहेर पडणे योग्य आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियस)
मुंबई (कु लाबा) ३३.१
सांताक्रूझ ३३.६,
अचलबाग ३३.३,
रत्नागिरी ३५.९,
पणजी (गोवा) ३५.६,
डहाणू ३४.८,
पुणे ३९.४,
लोहगाव ४०.७,
अहिल्यानगर -,
जळगाव ४२.२,
कोल्हापूर ३४.६,
महाबळेश्वर ३१.७,
मालेगाव ४०.८,
नाशिक ३९.४,
सांगली ३८.२,
सातारा ३९.३,
सोलापूर ४०.०,
धाराशिव ३९.१,
छत्रपती संभाजीनगर ४१.०,
परभणी ४१.०,
नांदेड ४१.२,
बीड ४०.८,
अकोला ४३.७,
अमरावती ४३.२,
बुलढाणा ४०.०,
ब्रह्मपुरी ४२.८,
चंद्रपूर ४३.०,
गोंदिया ४१.५,
नागपूर ४२.८,









