होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

Jalgaon News: जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस, चाकरमान्यांसह विक्रेत्यांची धावपळ; उकाड्यापासून काहीसा दिलासा

On: March 30, 2026 7:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: दरम्यान गेल्या दोन तीन दिवासांपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. उष्णतेने अंगाची लाहीलाही झाली आहे. तत्पूर्वी ३० मार्चला खान्देशसह राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे सायंकाळी ५;३० वाजेच्या दरम्यान वातावरणात अचानक गारवा पसरला. ढगांचा कडकडात सुरू होऊन जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे चाकरमाने आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. मिळेल त्या ठिकाणी नागरिक आसरा घेत होते, दुचाकीस्वारांची देखल तारांबळ उडाली. काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. पुढील दोन दिवस पाऊस पडणार असा अंदाज कृषी विभागानं दिला होता, त्याप्रमाणे शेतकऱ्यांची उघड्यावरील पिके झाकण्यासाठी धावपळ उडाली होती. रात्री ७ वाजेनंतर देखील विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला, रात्री उशीरा पर्यंत पाऊस सुरू होता.

आज अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले असून उकाड्याने काहीसा दिलासा दिला मिळाला असला तरी हा पाऊस पिकांचे नुकसान करणारा आहे, आता अवकाळीचने जिल्ह्यासह शहरातील काही भागात पाणी साचले होते, त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले, आता पावसाचा मुक्काम वाढणार आहे. ३० मार्चपासून राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली होती त्याप्रमाणे पावसाने हजेरी लावली आहे, उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीचे पिके वाचवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अचानक मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची आणि नागरिकांची धावपळ झाली.

दि. १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment