Latest Weather News: जळगावचे तापमान पुन्हा एकदा घसरले आहे. सोमवारी तापमान ४१.५ इतके होते, आज तापमानात किंचित वाढ झाली असून आज पारा ४२.५ अंश सेल्सियस इतका होता. तापमानाचा पारा कमी जास्त होत असला तरी वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे, दिवसभर उष्ण झळांनी नागरिक हैराण झाले आहे, अधूनमधून ढगाळ हवामान दिलासा देत असले तरी वातावरणात उष्णता कायम आहे. दरम्यान विदर्भ तापला असून तेथील तापमान हे ४५ ते ४७ अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे. त्यामुळे विदभातील नागरिकांची उष्ण वातावरणाने भाजनी होत आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया येथील तापमान ४६ अंशावर आहे.
राज्यात सार्वधिक तापमान ब्रम्हपुरीत
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४७.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे २९.५ अंश सेल्सियस आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट होती. कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाले आहे, कोकण गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३५.३,
सांताक्रूझ ३५.१,
रत्नागिरी ३४.१,
पणजी (गोवा) ३३.६,
डहाणू ३६.७,
पुणे ३७.०,
लोहगाव ३६.८,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४२.५,
कोल्हापूर ३६.०,
महाबळेश्वर २९.५,
मालेगाव ४२.४,
नाशिक ३६.५,
सांगली ३८.२,
सातारा ३७.७,
सोलापूर ४०.३,
धाराशिव ३९.८,
छत्रपती संभाजीनगर ४१.२,
परभणी ४३.०,
अकोला ४५.४,
अमरावती ४५.०,
बुलढाणा ४१.७,
ब्रह्मपुरी ४७.६,
चंद्रपूर ४६.०,
गोंदिया ४६.१,
नागपूर ४६.५,
वाशीम ४३.५,
वर्धा ४६.०,
यवतमाळ ४४.४.











