Letest Weather News: गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी पारा ४१ ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहचले होते. आज तापमान ४२ अशांवर गेले आहे. राज्यात सार्वधिक कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ४२.५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. राज्यभरात तापमान घसरले असतानाच जळगावमध्ये उन्हाचे चटके बसत होते, दुपारी कडक उन्हाच्या झळा लागत होत्या. रस्ते निर्मनुष्य होते. साहजिकच आज जळगावचा पारा ४२.५ अंशावर गेल्याने जिल्हा तापला होता. सर्वाधिक तापमानाचे विदर्भाला सध्या तापमान घसरल्याने हायसे वाटत असावे.
एकीकडे उन्हाचा तडाखा बसत असतानाच रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने झोडपले असून काजू पपई आणि इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आज आणि उद्या रविवारी आणि सोमवारी हवामान विभागाने येलो अलर्ट जरी केला आहे. वादळी पाऊस आणि वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडला आहे. कोकण- गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्रात किंचित वाढ झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
:
मुंबई (कुलाबा) ३४.४,
सांताक्रूझ ३५.६,
अलीबाग -,
रत्नागिरी ३६.९,
पणजी (गोवा) ३६.१,
डहाणू ३६.३,
पुणे ३८.६,
लोहगाव ४०.३,
अहिल्यानगर ४०.१,
जळगाव ४२.५,
कोल्हापूर ३७.२,
महाबळेश्वर ३१.१,
मालेगाव ४२.४,
नाशिक ४०.१,
सांगली ३६.०,
सातारा ३७.७,
सोलापूर ३९.७,
धाराशिव ३९.६,
छत्रपती संभाजीनगर ३९.२,
परभणी ३९.९,
नांदेड -,
बीड ४१.०,
अकोला ४२.२,
अमरावती ४०.४,
बुलढाणा ४०.४,
ब्रह्मपुरी ४०.३,
चंद्रपूर ३९.६,
गोंदिया ३९.०,
नागपूर ४०.४,
वाशीम ३८.८,
वर्धा ४१.५,
यवतमाळ ३८.२.






