होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

उकाड्याने केले बेजार, जळगावसह राज्याचे तापमान किती ‘ते’ जाणून घ्या.

On: June 12, 2026 7:58 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: विदर्भात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे, राज्यात सर्वात उष्ण शहर म्हणून वर्धा समोर आले आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे ४४.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. त्याखालोखाल ब्रम्हगिरी ४४.२, नागपूर ४४, अकोला ४३.४ अमरावती ४२.८ अंश सेल्सियस इतके तापमान वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ही तापमान ४२. ५ इतके राहिले आहे. जळगावचे तापमान ४२ अंशाच्या आसपास कायम आहे. येथील तापमान अद्यापही कमी होण्याचे चिन्हे दिसत नसून उष्मा जळगावकरांची परीक्षा बघत आहे. जूनचा अर्धा महिना गेला तरी पावसाचे चिन्हे दिसत नाहीये, १५ जून नंतर राज्यात सर्वत्र पडेल असा अंदाज असला तरी अल निनोने वातावरणांत गरमी अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली; कोंकण गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३६.०,
सांताक्रूझ ३५.३,
अलिबाग ३६.६,
रत्नागिरी ३४.२,
डहाणू ३६.७,
पुणे ३५.९,
लोहगाव ३६.०,
जळगाव ४२.५,
कोल्हापूर ३४.३,
महाबळेश्वर २६.१,
मालेगाव ४२.२,
नाशिक ३५.९,
सांगली ३५.४,
सातारा ३६.५,
सोलापूर ३८.५,
धाराशिव ३६.७,
छत्रपती संभाजीनगर ३९.९,
परभणी ३९.९,
नांदेड ४०.२,
बीड ४०.४,
अकोला ४३.४
अमरावती ४२.८
बुलढाणा ४१.६,
ब्रह्मपुरी ४४.२,
चंद्रपूर ४२.२,
गोंदिया ४१.८,
नागपूर ४४.०,
वाशीम ४२.५,
वर्धा ४४.५,
यवतमाळ ४३.२.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जिल्ह्यातील एक सत्र शाळांच्या वेळेत बदल करा: समन्वय समितीची मागणी

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि खरीप हंगामाचा मुख्य सचिवांकडून आढावा

अवैध वाळू वाहतुकीवर प्रांत अधिकाऱ्यांची धडक कारवाई; ४६ लाखाचा मुद्देमाल ताब्यात, वाळूने भरलेले दोन डंपर जप्त

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, पोलिसांनी सुमारे ८ लाखांचा दंड केला वसूल!

गोदावरीच्या किनारी आढळली एक काळ्या रंगाची सुटकेस, चैन उघडल्यावर पोलीसांना ही बसला धक्का!

नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला समाजापुढे नवा आदर्श; स्वतःच्या मुलांचा शासकीय शाळेत केला प्रवेश

Leave a Comment