Iran US Conflict America: होर्मूझ परिसरातील इराणच्या बंदरांवर अमेरिकन नौदलाद्वारे घातलेला नाकेबंदीचा वेढा अधिक कडक केला असतानाच, या आठवड्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये किमान तीन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘पलाऊ’चा ध्वज असलेल्या एका जहाजावर अमेरिकन लष्कराने हल्ला करून तीन भारतीय खलाशांचा बळी घेतल्यावर, भारतीय सरकारने बुधवारी नवी दिल्लीतील एका वरिष्ठ अमेरिकन मुत्सद्याला बोलावून याबद्दल स्पष्टीकरण मागितले. त्याआधी काही तास, अमेरिकेने ओमानच्याच किनाऱ्याजवळ ‘पलाऊ’चा ध्वज असलेल्या आणखी एका जहाजावर बॉम्बहल्ला केला होता, ज्यावर २४ भारतीय खलाशी होते. मात्र त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यामुळे अमेरिका अणे भारताचे संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
तसेच गुरुवारी, अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) सांगितले की, त्यांच्या सैन्याने ओमानच्या आखातात तिसऱ्या एका टँकरला “निष्क्रिय” केले; कारण या जहाजाने “इराणचे तेल वाहून नेण्याचा प्रयत्न करून इराणविरुद्धच्या नाकेबंदीचे उल्लंघन केले होते.” असे अल जंजिराने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

शुक्रवार सकाळपर्यंत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अधिकारी या दोघांनीही दोन्ही देशांमधील नाजूक युद्धविराम जो एप्रिलमध्ये इस्लामाबादच्या मध्यस्थीने झाला होता. किमान वाढवण्याच्या कराराबाबत आशावादी सूर लावला होता. परंतु होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंना अडकलेल्या हजारो खलाशांसाठी मात्र शांतता अजूनही दूरच आहे.
भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवरील हे हल्ले वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांमधील तणावाचा नवीन मुद्दा बाळ आहे; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. ट्रम्प यांची पुढील आठवड्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘ग्रुप ऑफ सेव्हन’ (G7) परिषदेत त्यांचे भारतीय समकक्ष नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांत, अमेरिकन लष्कराने भारतीय व्यापारी नौदलातील कर्मचारी असलेल्या तीन जहाजांवर हल्ले केले आहेत.











