होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शिवसेनेच्या(शिंदे गट) वर्धापनदिनी ऑपरेशन टायगर होणार पूर्ण? आता सर्वांच्या नजरा लोकसभा अध्यक्षांवर

On: June 18, 2026 5:56 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: शिवसेनेच्या (यूबीटी) सहा खासदारांनी गुरुवारच्या बैठकीला दांडी मारली, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात विलीनीकरणाचे संकेत मिळाले आहे, त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे हेच त्यांचे नेते आहेत. या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेची (यूबीटी) परिस्थिती अधिकच बिकट दिसत आहे, त्यांच्या नऊ लोकसभा खासदारांपैकी सहा जण गुरुवारच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. यावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेसोबत विलीनीकरण होणे आता औपचारिक बाब असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी दुपारी १२ वाजता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची भूमिका काय याची जाणून घेणार असल्याची माहिती आहे. तसेच योगायोग असा की शिवसेना (शिंदे गट) वर्धापन दिन सोहळा १९ जून रोजी मुंबईत होणार आहे, त्याच दिवशी बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना आपला नेता मानून प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.

बैठकीला कोण गैरहजर होते?

दरम्यान शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत बैठकीला उपस्थित होते. उर्वरित सहा खासदारांच्या अनुपस्थितीने पक्षाच्या संसदीय गोटात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. बैठकीला उपस्थित नसलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टिकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा जणांचा समावेश आहे. तसेच ओमराजे निंबाळकर हे माघारी परतणार असल्याची आज चर्चा होती.

शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरणाची मागणी

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाठाचे सर्व सहा बंडखोर खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाची मागणी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. हे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. तथापि, ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, पत्र पडताळणीसाठी अध्यक्षांच्या कार्यालयाला काही खासदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज भासणार आहे, असे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत हे होण्याची शक्यता सूत्रांनी सांगितले. सध्या खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी सुरू आहे.

शिवसेना (युबीटी) बुधवारी, आपल्या खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा तीन ओळींचा व्हीप जारी केला. बंडखोर नेत्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू करण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते. शिवसेनेचे (यूबीटी) लोकसभेत नऊ खासदार आहेत. त्याच वेळी, पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी किमान सहा खासदारांना एकाच वेळी पक्ष बदलावा लागेल.

व्हीपचे उल्लंघन केल्यास कारवाई

दरम्यान पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, “पक्षप्रमुखांशी (उद्धव ठाकरे) चर्चा करून व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.” तथापि, शिंदे गटातील सूत्रांनी व्हीपच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, दहाव्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) व्हीप केवळ सभागृहाच्या कामकाजासाठीच जारी केला जाऊ शकतो, पक्षाच्या अंतर्गत सभांसाठी नाही.

शिंदे गटातील एका अधिकाऱ्याने सांगितले, “संघटनात्मक शिस्तीचा भाग म्हणून राजकीय पक्ष अंतर्गत सूचना (सभांसाठीसुद्धा) जारी करू शकतो, असे न्यायालयांनी वारंवार म्हटले आहे. परंतु, सभागृहातील मतदानाशी संबंधित नसल्यास, अशा व्हीपचे पालन न केल्यास दहाव्या अनुसूचीनुसार कोणतीही कारवाई होत नाही.”

संसद अध्यक्ष बिरला यांच्याशी भेट

सूत्रांनुसार, शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आणि बुधवारी मुंबईत परतले. ते अविभाजित शिवसेनेतील २०२२ च्या फुटीचे मुख्य सूत्रधार होते, ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. बुधवारी, सावंत, देसाई आणि राऊत यांनी बिरला यांची भेट घेतली आणि त्यांना कोणतीही बेकायदेशीर पक्षांतर टाळण्याचे आवाहन केले. देसाई म्हणाले होते, “कायद्यानुसार, दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असला तरीही कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही. आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत असेल तरच मूळ पक्ष विलीन होऊ शकतो.”

ऑपरेशन टायगरला पूर्णतेला वर्धापनाचा मुहूर्त?

महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (युबीटी)पक्षाला दिलेला धक्का आता अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीतील ‘लीला हॉटेल’मधून त्यांना थेट राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आले होते. हे ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार आज (१८ जून) संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. मुंबईतील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या प्रसिद्ध ‘वेस्टीन हॉटेल’मध्ये या सर्व खासदारांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. १९ रोजी शिवसेना (शिंदे गट) वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. त्यादिवशी शिवसेनेने भव्य कार्यकम ठेवला असून त्याच दिवशी बंडखोर खासदारांचा अधिकृत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment