Jalgaon News: नाशिक विधानपरिषदेस जळगावच्या जागेवर सर्वांचे लक्ष होते, शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या ही रिंगणात कायम होत्या. मात्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने आपला गड कायम राखत दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी ६१६ पैकी तब्बल ५८२ मते मिळवत एकतर्फी विजय संपादन केला. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना केवळ १७ मते मिळाली तर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेले अपक्ष अनिल चौधरी यांना ११ तर शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना स्वतःचे एकच मत मिळाले. दरम्यान, मतमोजणीत ५ मते अवैध ठरल्याने निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
महायुतीत मिठाचा खडा
त्यामुळे नाशिकला शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला तर भाजपने आपला गड कायम राखला, त्यामुळे महायुतीत कही खुशी, कही गम असे माहोल होते. नाशिकच्या जागेवरून मात्र शिंदे गटाने भाजपवर युतीधर्म पळाला गेला नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण असले तरी मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे.
युतीधर्म पाळला नाही
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी “जळगावमध्ये आम्ही युतीचा धर्म पाळल्याचे सांगून नाशिक मध्ये त्याचे पालन झालं नसल्याचा आरोप केला आहे, नेमकी नाशकात कोणी मदत केली नाही याची माहिती आमचे नेते एकनाथ शिंदे आणि उदय सामंत घेतील” असे ते म्हणाले. तसेच शिंदे गटात भाजपच्या भूमिकेविषयी नाराजी आहे. भाजपने मदत केली नसल्याने आरोप आता केला जात आहे .
भाजपवर तीव्र नाराजी
तर जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे यांनी नाशिकच्या निकालानंतर भाजपवर तीव्र नाराजी दर्शविली आहे. नाशिकच्या निकालावरून महायुती खडा पडल्याचे सरिता कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान गोकुळ गीते यांच्या विजया मागे अदृश्य शक्तींचा हात असल्याचे म्हणत सरिता कोल्हे यांनी थेट भाजपावरच निशाणा साधला.











