Latest Weather News: राज्यात कमाल तापमान अमरावती जिल्ह्याचे ४५.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे, तर त्यापाठोपाठ वाशीम ४५.५, अकोला ४५.४, नागपूर ४५ तापमानाचा पारा गेल्याने या तिन्ही जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. अकोला आमी अमरावती यांच्या आलटून पालटून कमाल तापमानाची नोंद होता आहे. अकोला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सर्वाधिक उष्ण ठिकाण असल्याचे दिसू आले. आज अमरावती राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ४५.६ इतके गेले आहे. वाढत्या तापमानाने उष्माघाताचे बळी जात आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान आज ४२.४ अंश सेल्सियस इतके घसरले असले तरी वातावरणात असह्य उकाडा कायम आहे. उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहे.
गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३४.४,
सांताक्रूझ ३४.२,
अलिबाग ३४.९,
रत्नागिरी ३४.७,
पणजी (गोवा) ३३.४,
डहाणू ३५.०,
पुणे ३६.२,
लोहगाव ३८.०,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४२.४,
कोल्हापूर ३५.०,
महाबळेश्वर २८.२,
मालेगाव ४२.०,
नाशिक ३५.८,
सांगली ३८.०,
सातारा ३६.७,
सोलापूर ४१.४,
धाराशिव ४१.०,
छत्रपती संभाजीनगर ४०.८,
परभणी ४२.७,
बीड ४१.५,
अकोला ४५.४,
अमरावती ४५.६,
बुलढाणा ४१.५,
ब्रह्मपुरी ४३.३,
चंद्रपूर ४३.८,
गोंदिया ४०.०,
नागपूर ४५.०,
वाशीम ४२.५,
वाशीम ४५.५ ,
यवतमाळ ४३.६.






