T20 World Cup 2026 : बांगलादेश क्रिकेट संघ भारतात होत असलेल्या टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्याचे बांगलादेश सरकारने अधिकृतपणे पुष्टी केली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या ग्रुप बदलण्याच्या मागणीला आयसीसीने नकार दिला. यामुळे बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे बांगलादेश सरकारने सांगितले.
बांगलादेश सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जागतिक क्रिकेटच्या स्थितीबद्दल त्यांना खात्री नाही, परंतु या खेळाची लोकप्रियता निश्चितच कमी होत आहे. क्रिकेट ऑलिंपिकमध्ये जात आहे, परंतु जर बांगलादेशसारखा देश सहभागी झाला नाही तर ते आयसीसीचे नुकसान आहे.
मुस्तफिजुर रहमानबाबत एक निवेदन जारी
मुस्तफिजुर रहमानला इंडियन प्रीमियर लीगमधून सोडल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तापले. बीसीसीआयच्या सूचनेनुसार कोलकाता नाईट रायडर्सने रहमानला त्यांच्या संघातून सोडले. केकेआरने मिनी-लिलावात मुस्तफिजुर रहमानला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले होते. मुस्तफिजुरचा मुद्दा वेगळा नव्हता; फक्त बीसीसीआयच हा निर्णय घेऊ शकते, असेही बांगलादेश सरकारने म्हटले आहे.
स्कॉटलँड संघाला संधी
आयसीसीकडून बांग्लादेश असलेल्या गटात आता स्कॉटलँड संघाला स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. या गटात इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज हे संघ आहे. स्कॉटलँडचे सुरूवातीचे तीन सामने कोलकात्यात होतील. तर शेवटचा साखळी फेरीचा सामना मुंबईत होणार आहे.










