Child Rearing Tips : प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपले मूल सुसंस्कृत, बुद्धिमान, प्रामाणिक आणि आयुष्यात यशस्वी व्हावे. मात्र केवळ शिक्षण पुरेसे नसते; लहानपणी रुजवलेल्या सवयीच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा भक्कम पाया घडवतात. तज्ज्ञांच्या मते, पाचव्या वर्षानंतर मुलांची निरीक्षणशक्ती आणि आकलनक्षमता झपाट्याने वाढते. या वयात शिकवलेल्या गोष्टी ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. त्यामुळे पालकांनी काही मूलभूत सवयी जाणीवपूर्वक मुलांमध्ये विकसित करणे गरजेचे आहे. या सवयी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
सत्य बोलण्याची सवय
मुलांना प्रामाणिक राहण्याचे महत्त्व पटवून द्या. चूक झाली तरी ती मान्य करणे योग्य आहे, हे शिकवा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चारित्र्य घडते.
‘नाही’ म्हणण्याचे धैर्य
मुलांना योग्य-अयोग्य ओळखायला शिकवा. अस्वस्थ वाटल्यास ठामपणे ‘नाही’ म्हणता येणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
आदराची जाणीव
वडीलधाऱ्यांचा, शिक्षकांचा आणि इतरांचा आदर करणे ही संस्कारांची पायाभरणी आहे. यामुळे मुलांमध्ये नम्रता आणि संवेदनशीलता वाढते.
वेळेचे महत्त्व
वेळ अमूल्य आहे हे लहानपणापासून पटवून द्या. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची सवय शिस्त आणि जबाबदारी निर्माण करते.
कृतज्ञता आणि माफी
“धन्यवाद”, “माफ करा” आणि “कृपया” यांसारख्या शब्दांचे मूल्य शिकवा. पराभव स्वीकारण्याची तयारीही त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते.
स्वच्छता आणि शिस्त
वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि चांगल्या सवयींवर भर द्या.
स्क्रीनपासून अंतर
मोबाईल आणि दूरदर्शनपेक्षा वाचन, खेळ आणि संवाद यांना प्रोत्साहन द्या. या सवयी लहानपणी रुजवल्यास मुलांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण आणि मजबूत घडण्यास निश्चितच मदत होते.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)









