होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सूर्य आग ओकतोय, २८ मे पर्यंत उष्णतेची लाट; सहा दिवसांचा ऑरेंज अलर्ट

On: May 23, 2026 2:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Delhi News: देशभरातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे, अनेक राज्यांमध्ये तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. (आयएमडी) भारतीय हवामान खात्याने २८ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, दिल्ली-एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि ताशी ८० किमी वेगाने वारा वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरप्रदेश येथील बांधा, मध्य प्रदेशातील खजुराहो आणि महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे ही ४८ अंशावर किंवा आसपास तापमान गेले आहे.

उष्णतेमुळे आता नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. शुक्रवारी देशाच्या अनेक भागांमध्ये तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे आणि त्याच वेळी तापमानात कोणताही दिलासा मिळत नसल्याने, लोकांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) इशारा दिला आहे की, येत्या २८ मे पर्यंत वायव्य, मध्य-पूर्व आणि भारताच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बांधा यथे ४८.२ अंश सेल्सियस तापमान होते. महाराष्ट्रातील विदर्भ ब्रम्हपुरी यथील तापमान देखील ४७.२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. त्यामुळे देशातील अनेक राज्यात तापमानाने भाजणी झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहर/प्रदेश राज्य तापमान शुक्रवार

बांदा, उत्तर प्रदेश ४८.२°से
खजुराहो, मध्य प्रदेश ४८.०°से
ब्रह्मपुरी, विदर्भ, महाराष्ट्र ४७.२°से
वर्धा, महाराष्ट्र ४७.१°से
नजफगड, दिल्ली ४७.०°से
रोहतक, हरियाणा ४६.९°से
बठिंडा, पंजाब ४६.६°से
नागपूर, महाराष्ट्र ४६.५°से
श्रीगंगानगर, राजस्थान ४६.२°से
प्रयागराज, उत्तर प्रदेश ४६.०°से

उष्ण लाटेचा २८ मे पर्यंत इशारा

देशातील अनेक राज्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) २२ ते २८ मे दरम्यान तीव्र उष्णतेच्या लहरींचा इशारा दिला आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये उष्णतेची लाट दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तविली आहे. राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेची लाट असून, पश्चिम राजस्थानमध्ये २४ ते २८ तारखेपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि हिमालयीन राज्यांच्या काही भागांमध्येही वेगवेगळ्या दिवशी उष्णतेची लाट आहे.

आयएमडी नाऊकास्टच्या इशाऱ्यानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये ६०-८० किमी/तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वीज पडण्याचीही शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, धुळीच्या वादळानंतर वादळाचा वेग बदलू शकतो आणि अनेक ठिकाणी दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो. हवामान विभागाने सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मोकळ्या जागेत बाहेर पडा, झाडे आणि दुर्बीणांपासून दूर राहा आणि सुरक्षित राहा. आयएमडीने लोकांना हवामानाच्या सततच्या माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

युपी तापले

यामध्ये तीव्र तापमानामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांचा समावेश आहे. बांदा हे देशातील सर्वात उष्ण शहर आहे, येथील तापमान ४७.६ अंश सेल्सिअस होते आणि फळे ही वितळली होती. प्रयागराजमध्ये ४६.६ अंश आणि वाराणसीमध्ये ४५.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी, बांदा प्रशासकाने ठराविक वेळेसाठी वाहतूक सिग्नल बंद करणे आणि उन्हात जास्त वेळ उभे न राहणे यासारखी पावले उचलली.

या राज्यांवर ही परिणाम

राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्येही उष्ण वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. हरियाणातील रोहतक येथे ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, त्यानंतर फरिदाबादच्या अनेक भागांमध्ये ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. गुरुग्राममध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने प्रशासकाने २४ ते २७ तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की उष्ण आणि कोरडी हवा आहे. पूर्व भारत, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये २६ मे पर्यंत उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, केंद्र सरकार, एनटीए, सीबीआयला नोटीस

होर्मुझ ते युरेनियम हस्तांतरणापर्यंत, अमेरिका-इराणच्या संभाव्य करारामध्ये आणखी काय समाविष्ट आहे ‘ते’ जाणून घ्या.

एकाच गोळीने दोघांचा मृत्यू, दोघे ही पती-पत्नी; नेमकी घटना काय ते जाणून घ्या!

इराण आणि अमेरिका शांतता करार प्रगतीपथात; पाकिस्तान मध्यस्थाच्या भूमिकेत

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानचा खेळ खल्लास! अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या

धक्कादायक!..जेव्हा जन्मदाताचं बनतो वैरी, पित्याने मुलीचे तुकडे करत केली हत्या! पोलिसांनी कसा लावला छडा ‘ते’ जाणून घ्या!

Leave a Comment