होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नेपाळ विनाशकारी पूर अन् भूस्खलन: मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली

On: August 29, 2026 3:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Nepal Flash Flood: नेपाळमधील विनाशकारी पूर आणि भूस्खलनानंतर एक नवा धोका समोर आला आहे. याठिकाणी दोन जलाशय तयार झाले आहे. एका तलावातून सतत पाणी गळत आहे, तर दुसऱ्या तलावाचा आकार वाढत आहे. आणखी एक पूर किंवा भूस्खलनाच्या शक्यतेने अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे. नेपाळ-चीन सीमेजवळील भूस्खलनानंतर हे दोन जलाशय तयार झाले आहेत. यापूर्वी याच भागात अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. त्याठिकाणी चिखल, वाळू, खडी आणि मोठे दगड प्रवाहाच्या दिशेने वाहून गेले, नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे (flash floods) शनिवारी मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली आहे. दरम्यान, बचाव पथके शोध आणि मदतकार्य राबवत आहेत. सुमारे २,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले, तरी २४०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यात ४०० भारतीय नागरिक आहे.

बुधवारी नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे बर्फ आणि खडकांचे प्रचंड स्खलन झाले. यामुळे पाणी, चिखल आणि अवशेषांचा लोंढा मध्य नेपाळमधून वेगाने खाली वाहून आला, ज्याने अनेक शहरे व गावांची नासधूस केली, घरे, वाहने, रस्ते व पूल वाहून नेले आणि जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान केले.

मुख्य रस्ते आणि महामार्गांपासून संपर्क तुटला

पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळ-चीन सीमेला जोडणारा पासांग ल्हामू महामार्गाचा ४० किलोमीटरहून अधिक भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. यामुळे उत्तरेकडील रसुवा जिल्ह्याचा देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. ग्यिरोंग बंदराकडे जाणारा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गही बंद आहे.

तिबेटमधील पुराने हाहाकार

चीनच्या सरकारी माध्यमांनी तिबेटमधील पुराच्या विध्वंसाची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये परिसर पूर्णपणे चिखल आणि दगडांनी झाकलेला दिसत आहे. बचाव पथकाचे सदस्य ढिगाऱ्यांमध्ये लोकांचा शोध घेताना दिसत आहेत. डोंगर पार करून, खडकांवर चढून आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या ओलांडून बचाव पथके शुक्रवारी दुपारी ग्यिरोंग बंदरावर पोहोचली. तिबेटमधील पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांपैकी हा एक आहे. ग्यिरोंग बंदर हा नेपाळ आणि तिबेट दरम्यान पर्यटक आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख मार्ग होता. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांनुसार, हा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या परिसरात किमान ५५४ लोक बेपत्ता तर सात जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

नेपाळ विनाशकारी पूर: मृतांची संख्या ४६९ वर; लोकांना वाचवण्याच्या बचावकार्यला गती; ३७ भारतीय काठमांडूकडे रवाना

Leave a Comment