होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

CJP म्हणजेच काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

On: August 31, 2026 7:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉकरोच जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सीजेपी ही केवळ छोटीशी संघटना नाही, सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम आहे. अशी विरोधकांवर टीका केली. या संघटनेत भारत जोडो मधील संघटना सहभागी असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. विरोधकांकडे आता मुद्दे नाहीत म्हणून ते आता हिंदू कसे चुकीचे आहे, हे सांगत बसतील असा टोला ही फडणवीस यांनी लगावला.

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विरोधकांची आपल्या विचारांना विरोध करण्याची क्षमता संपली असून आता काही मुद्द्यांवरून ते दंगा करतील, हिंदू समाज कसा चुकीचा आहे हे सांगत बसतील, हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांचे पुढचे टार्गेट आता कुंभमेळा आहे, असे ही फडणवीस म्हणाले. डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, असे सांगून सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची क्षमता फक्त पुण्यातच आहे. असे ते म्हणाले.

विरोधकांचे काम हिंदूंना बदनाम करणे

विरोधकांवर टीका करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदुत्वाला यांनी विरोध केला, राम मंदिराला विरोध केला. या विरोधामुळेच जनतेने यांना घरी बसवलं आहे. राम मंदिरातील दानपेटीतील काही प्रमाणात घोटाळा झाला हे सत्य आहे. मात्र सगळं मंदिरच लुटल्याचा आव विरोधकांनी आणणे म्हणजे तसा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करणे होय, आता यांचे पुढचे टार्गेट हे कुंभमेळा आहे, असे फडणवीस म्हणाले.विरोधकांचे पोपट कुंभमेळ्यात भ्रष्टाचार होत असल्याचं सांगत आहे. पण, कुंभमेळ्यात आतापर्यंत जेवढे टेंडर झाले आहेत, त्याचे चार टप्प्यांमध्ये ऑडिट होत आहे. खोटं बोला पण रेटून बोला असं विरोधकांचं सुरू आहे, असा टोमणा ही त्यांनी मारला.

राहुल गांधींवर केली टीका

खरे तर, “महिला आरक्षणाला विरोध करणारे कांग्रेस आणि त्यांचे घटकपक्ष होते. पहिले पाठिंबा दिला, आता विरोध का? महिला आरक्षणाचे खरे हत्यारे राहुल गांधी हेच असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण कायद्याचा राहुल गांधींनी शिरच्छेद केला. राहुल गांधी रोज खोटं बोलतील. मात्र आपण सत्य घेऊन जनतेत गेले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मतदार याद्यात चोरी करण्याचा भाजपचा डाव: हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप नाशिकला काँग्रेसच्या १० दिवसीय शिबिरास सुरुवात..समारोपाला राहुल गांधी यांची उपस्थिती

मंत्री भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही!

पुणे राज्याचे लक्ष वेधणार: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही लवकरच दौरा? पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी येण्याची शक्यता

नंदुरबारचे पदाधिकारी विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी; भाजप मंत्र्यांसोबतच्या ऑडिओ क्लिपमुळे पडली विकेट?

तिढा सुटला: नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडला भरत गोगावले यांची नियुक्ती

स्व. गोपीनाथ मुंडें यांच्या बाबत कॉग्रेसचे जेष्ठनेते पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्त्वाचे विधान; पत्रकार परिषदेत काय म्हणाले ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment