होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

CJP Protest: चार वेळेस चर्चेचा प्रस्ताव: मंत्री जितेंद्र सिंह काय म्हणाले ‘ते’जाणून घ्या

On: July 23, 2026 5:57 PM
Follow Us:
---Advertisement---

CJP Protest: पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जंतर-मंतरवर सीजेपीच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, केंद्र सरकारने चर्चेचे प्रस्ताव चार वेळा पाठवल्याचा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकार कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी चर्चेसाठी तयार आहे. दरम्यान, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. चर्चेमुळे हा तिढा सुटेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला सरकारने चर्चा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाने हा प्रस्ताव फेटाळला असून तसे वृत्त एएनआयने गुरुवारी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले. दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सरकारने आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना चार वेळा औपचारिक चर्चेचे प्रस्ताव पाठवले आहे. ते पुढे म्हणाले, सरकार कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आणि आंदोलकांना सोयीस्कर असेल त्यावेळी चर्चा करण्यास तयार आहे. तथापि, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या सीजेपीने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे आंदोलन आणि सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. (CJP Protest)

दरम्यान पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांवरून सरकार आणि आंदोलक यांच्यात मतभेद आहे. सीजेपीन शिक्षण व्यवस्थेवर सर्वसमावेशक चर्चा, परीक्षा पद्धतीत बदल आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, २५ दिवसांपासून उपोषणावर असलेले लडाखचे शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका नरम केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणांवरील खटले मागे घेतल्यास, ते आंदोलकांना आंदोलन स्थगित करून सरकारशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन करतील, असे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

Leave a Comment