होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता किती ‘ते’ जाणून घ्या

On: August 17, 2026 6:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: सोमवारी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये दोन भूकंपांचे धक्के बसले. गेल्या महिनाभरात राज्यात २० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तज्ज्ञ याला ‘भूकंपांचा समूह’ म्हणत आहेत. ८ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये ४.३ तीव्रतेच्या सर्वात शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली होती. दरम्यान एका पाठोपाठ बसणारे भूकंपाचे हादरे एखाद्या मोठ्या आपत्तीचे संकेत तर देत नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, २.५ आणि ३ तीव्रतेचे धक्के अनुक्रमे सकाळी ५:०६ आणि दुपारी १२:४० वाजता जाणवले. भूकंपाचे धक्के पाच किलोमीटर खोलीवर जाणवले. असे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.

सोमवारी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक अहवालानुसार, यात कोणाचाही मृत्यू झाला नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असेही स्पष्ट केले.

यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले

शनिवार आणि रविवारी दि. २५ ते २६ जुलै रोजी दोन दिवस धक्के जाणवले. पेठ तालुक्यातील शिवसेना गाव परिसरात रविवारी पहाटे २ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. तर दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि गाडगी वाडा परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने सीएसआयआर-एनजीआरआय येथील भूकंपमापन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ४५ किलोमीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेची नोंद झाली आहे. तसेच ६, ८, १० आणि १४ ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. त्यावेळी, सुरगाणा तालुक्यातील भादर आणि दिंडोरी तालुक्यातील नानाशी येथील घरांच्या भिंतींना तडे गेले होते.

गेल्या दोन आठवड्यांपासून भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून लहान भूकंपांची मालिका जाणवत आहे. सर्वात तीव्र धक्के नाशिक आणि पालघरमध्ये जाणवले. तज्ज्ञ याला भूकंपांचा समूह (earthquake swarm) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा भूकंपांचा एक समूह असू शकतो. गेल्या आठवड्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमधील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून जनतेमध्ये जनजागृती मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले.

भूकंप किती वेळा झाले आहेत?

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात २० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यांची तीव्रता २ ते ४.३ च्या दरम्यान होती. हे भूकंप जमिनीखाली अंदाजे ५ ते ८ किलोमीटर खोलीवर झाले. तर सर्वात तीव्र भूकंप कोठे झाला? या कालावधीतील सर्वात तीव्र भूकंप ८ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये झाला, ज्याची तीव्रता ४.३ होती. या भूकंपाची नोंद ५ किलोमीटर खोलीवर झाली.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment