होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

E-Peek Pahani : शेतकऱ्यांनो, आता उरले शेवटचे तीन दिवस; जाणून घ्या काय का महत्त्वाची आहे पीक पाहणी ?

On: January 22, 2026 7:24 AM
Follow Us:
---Advertisement---

E-Peek Pahani : रब्बी हंगाम २०२५ ची ‘ई-पीक पाहणी’ करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातात आता केवळ ३ दिवस शिल्लक आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप आपल्या पिकांची ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणीची वाट न पाहता आजच ही प्रक्रिया पूर्ण करावी. आपला हक्क सुरक्षित करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे संबंधित विभागाने म्हटले आहे.

पीक पाहणी का महत्त्वाची ?

बँकेकडून कर्ज घेताना पीक पाहणीचा अहवाल आवश्यक असतो. नैसर्गिक आपत्तीः मदत पिकांचे नुकसान झाल्यास शासकीय मदत मिळवण्यासाठी याची नोंद अनिवार्य आहे. धान्य विक्री : सरकारी खरेदी केंद्रावर धान्य विकण्यासाठी सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.

तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. जर शेतकऱ्यांनी वेळेत पीक पाहणी पूर्ण केली नाही, तर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पीक विम्याचे संरक्षण मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते.

ई-पीक पाहणी कशी करावी?

  • ई-पीक पाहणी अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा.
  • ओपन पर्यायावर क्लिक करा.
  • महसूल विभाग निवडा.
  • खातेदार नोंदणी करून त्यात विचारलेली माहिती भरा.
  • पीक माहिती नोंदवा.
  • पिकाचा हंगाम आणि पिकाचा वर्ग निवडा.
  • जमीनीचे क्षेत्राबद्दल माहिती भरा.
  • जल सिंचनाचे साधन निवडा.
  • पिकाची सिंचन पद्धत लागवडीची तारीख निवडा.
  • पिकाचा फोटो काढून अपलोड करा.
  • सबमीट पर्यायावर क्लिक करा.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

Leave a Comment