Jalgaon News: प्रसिद्ध साहित्यिक, कवी प्रकाश रामदास तेली यांना काल पाचोरा येथे आयोजित एका भव्य समारंभात रोटरीच्यावतीने रोटरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी योगिता प्रकाश तेली यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा गव्हर्नर डॉ. राजेश पाटील, असिस्टंट गव्हर्नर हरविंदरसिंग थेडी, पाचोरा-भडगाव 2025-26 चे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी तसेच 26-27 चे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, सचिव (प्रशासन) डॉ. स्वप्नील पाटील, सचिव (प्रकल्प) प्रशांत सांगडे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश तेली हे कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार आहेत. त्यांनी पाच हजार कविता आणि सात हजारांहून अधिक घोषणा (स्लोगन) लिहिले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी कथा, चरित्रे आणि निबंधांचेही लेखन केले आहे. प्रकाश तेली यांनी विविध सामाजिक मुद्द्यांवर इतक्या मोठ्या संख्येने कविता आणि घोषणा लिहिल्या आहेत की, या बाबतीत त्यांची कामगिरी जागतिक स्तरावरील कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेपेक्षाही अधिक आहे. त्यांचे संपूर्ण साहित्य अत्यंत रंजक, माहितीपूर्ण आणि मौलिक आहे.

निस्वार्थी लेखन
त्यांनी अशा प्रकारची पुस्तके लिहिली आहेत जी यापूर्वी कधीही लिहिली गेली नव्हती. त्यांच्या अनेक पुस्तकांना कॉपीराइट (प्रत-हक्क) संरक्षणही मिळाले आहे.प्रकाश तेली यांचे लेखन निस्वार्थी आहे. ते प्रत्येक नागरिक, प्राणी, पक्षी आणि सजीव यांच्या जीवनाला स्पर्श करते आणि त्यांच्या अस्तित्वाशी एक खोल नाते निर्माण करते. त्यांच्या प्रकाशित साहित्यातील प्रत्येक शब्दात जीवनाचे विविध पैलू बदलण्याची क्षमता आहे. यात शंका नाही की, त्यांचे साहित्य केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला योग्य दिशा दाखवते, असे गौरव उद्गार मान्यवरांनी काढले.
प्रकाश तेली यांची २१ पुस्तके यापूर्वीच प्रकाशित
बाल-विवाह, बढ़ती जनसंख्या, सड़क सुरक्षा, किसान, वोट, नदी भारत की जलधारा, वोट-2, वोट-3, खाद्य सुरक्षा, वोट-4, मन की बात, पानी, बिजली संरक्षण, शिक्षा की महत्ता, पेड़ की महत्ता, झाडे जीवनाचा आधार (मराठी), प्रकृति की महत्ता, जीवन काय आहे? (मराठी), प्रेरणादायी विचार (मराठी), शाश्वत विचार (मराठी), लोकनेता (मराठी) आदी 21 पुस्तके प्रकाशित झालेली आहे.









