होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

RBI New Rule: ग्राहकांसाठी खूशखबर! SMS अलर्ट आता मोफत; बँका शुल्क आकारू शकणार नाहीत, RBI चा निर्णय

On: July 9, 2026 4:39 PM
Follow Us:
---Advertisement---

RBI New Rule: बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेच्या एसएमएस संदर्भात ही अपडेट असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २४ जून रोजी जारी केलेल्या आपल्या निर्देशानुसार, आता बँका अनुपालन, जागरूकता आणि प्रचारात्मक उपक्रमांशी संबंधित एसएमएस अलर्टसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारता येणार नाही. ग्राहकांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली तरी बँकांच्या कमाईवर मात्र याचा परिणाम होऊ शकतो. ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या विशिष्ट एसएमएस अलर्टसाठी शुल्क आकारण्यावरील बंदीमुळे प्रमुख बँकांचे वार्षिक शुल्क उत्पन्न ३०० कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

आतापर्यंत, बहुतेक बँका या संदेशांचा खर्च भरून काढण्यासाठी ग्राहकांकडून प्रति तिमाही १५ ते १८ रुपये आकारत असत. मात्र, आता आरबीआयने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, बँका अनुपालन, जागरूकता आणि प्रचारात्मक उपक्रमांशी संबंधित एसएमएस अलर्टसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारू शकत नाहीत. आरबीआयने बँकांना ५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट पाठवण्याच्या आवश्यकतेतून सूट दिली आहे.

याचा अर्थ असा की, बँका अशा लहान व्यवहारांसाठी एसएमएसऐवजी इतर डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतात. मात्र एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांसारख्या मोठ्या खाजगी बँका सध्या हे सुरू ठेवू शकतात. या बँकांचा विश्वास आहे की, त्वरित एसएमएस सूचनांमुळे ग्राहकांचा अनुभव सुधारतो आणि फसवणुकीचा धोका कमी होण्यास मदत होते.

एसएमएस चार्ज घेता येणार नसले तरी बँकांना यापुढे ग्राहकांकडून खाते देखभाल शुल्क, किमान शिल्लक शुल्क किंवा इतर बँकिंग शुल्कांसारख्या इतर शुल्कांमधून त्याची परतफेड करू शकतात. एका अंदाजानुसार, जर एखाद्या मोठ्या बँकेचे सुमारे ५ कोटी शुल्क भरणारे ग्राहक असतील, तर एसएमएस शुल्क बंद केल्यामुळे वार्षिक सुमारे ३६० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होऊ शकते. आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम केवळ बँकांपुरता मर्यादित राहणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

विद्यार्थ्यांसाठी खा. शरद पवार मैदानात, थेट जंतम-मंतर गाठले; तरुणांच्या आदोलनाला समर्थन

विरोधीपक्ष नेते खा. राहुल गांधी यांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा; रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची ही घेतली भेट

नीट पेपरफुटी प्रकरण: पंतप्रधानाचे महत्त्वाचे विधान; काय म्हणाले ते जाणून घ्या

लाठीचार्जनंतर: सोनम वांगचुक आपले उपोषण सुरूच ठेवणार; आंदोलनाचा आज निर्णायक दिवस, जंतर-मंतरवर सुरक्षेत वाढ

सीजेपी आंदोलनाने सरकार नरमले, मंत्री जे पी नड्डा नेतृत्वाशी चर्चा करणार; ‘या’ आहेत सीजेपीच्या मागणी

सीजेपीचा दावा, अभिजित दीपके पोलिसांच्या ताब्यात;..तर पोलीस म्हणाले, दिपके ताब्यात नाही! दीपकेंनी उपोषण सोडले

Leave a Comment